konkandhara.com

मराठवाडा

एका तासात दोन जीआर! सरकारच्या घाईगडबडीवर भुजबळांचा स्फोटक सवाल

मुंबई :मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांवर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. एका तासाच्या आत दोन वेगवेगळे जीआर काढले गेल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ ओबीसी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. पहिल्या जीआरमध्ये “मराठा समाजातील पात्र व्यक्ती” असा उल्लेख होता. मात्र मनोज जरांगेंच्या आक्षेपानंतर हा शब्द वगळून तात्काळ दुसरा जीआर काढला गेला. “जर चुकीचं होत असेल तर मी कसा काय गप्प राहू? मी माझं मत मांडणार,” असा इशारा भुजबळांनी दिला. शब्दांची हेराफेरी की धोरणात्मक गोंधळ? भुजबळांनी सरकारवर शब्दांची हेराफेरी करून आंदोलन शमवण्याचा आरोप केला. ते म्हणाले, “सरसकट हा शब्द काढून जीआरमध्ये शब्दांशी खेळ केला गेला. पण यामुळे ओबीसींच्या हक्कावर गदा येणार आहे. मराठा समाज ही रुलिंग कम्युनिटी आहे. कोर्टानेही स्पष्ट केलंय की ते सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत.” ओबीसींचा वाटा कमी होणार? भुजबळांच्या मते, आधीच ओबीसी समाजाला मिळणाऱ्या आरक्षणातला मोठा हिस्सा मराठा समाजाकडे जाण्याचा धोका आहे. “एका घरात दहा लोक आहेत, त्यांना बाहेर काढलं नाही; पण आणखी दहा बसवले, तर धक्का बसणारच,” असं त्यांनी स्पष्ट केलं. दिशाभूल केल्याचा थेट आरोप भुजबळांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीचा उल्लेख करत, “सरसकट शब्द काढून हैदराबाद गॅझेट लागू करण्याचं ठरवलंय असं सांगण्यात आलं. पण माझ्याकडे दाखले आहेत की कुणबी आणि मराठा या वेगळ्या जात आहेत. जीआर माझ्या सल्ल्याने काढला अशी दिशाभूल करू नका,” असा थेट निशाणा सरकारवर साधला. सरकार दबावाखाली? “एका तासात दोन जीआर निघाले, सचिवांच्या सह्या आहेत. हा बदल दबावाखाली झाला की प्रेमाखाली? सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे,” असा खोचक सवाल भुजबळांनी उपस्थित केला.

एका तासात दोन जीआर! सरकारच्या घाईगडबडीवर भुजबळांचा स्फोटक सवाल Read More »

गरीब मराठ्यांची लढाई आम्हीच लढतोय; कुणाच्याही खोडीला काही होणार नाही” – मनोज जरांगे पाटील

छत्रपती संभाजीनगर | मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, मराठा समाज आरक्षणात जाणारच आणि यावर आता कुठलाही संभ्रम नाही. “कुणाच्या खोडीला काही होणार नाही. सरकारने काढलेला जीआर योग्य असून, त्यात जर त्रुटी असतील तर दुरुस्त केल्या जातील,” असं ठाम विधान त्यांनी केलं. सध्या उपचार घेत असताना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला. 🔹 “मुलं मुंबईतून जिवंत करून आली” जरांगे म्हणाले –“जर आमचा सरकारवर, फडणवीसांवर राग असता, तर आमची मुलं निब्बर बनियानवर असती. पण त्यांनी मुंबईत जिवंत परत येऊन दाखवलं.” 🔹 जीआर मान्य, पण त्रुटी दुरुस्त “जीआरमध्ये काही त्रुटी आहेत, पण त्या दुरुस्त करू. सुधारित जीआर लवकरच निघेल.” “प्रक्रिया, टाइम बॉंड आणि सुरुवातीची तारीख याबाबत मुख्यमंत्री व विखे पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे.” “आम्ही सरसकट आरक्षण नको म्हणत नाही, पण गरीब मराठे थेट आरक्षणात जातील.” 🔹 संजय राऊत व इतरांना प्रत्युत्तर “हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हाताळलं, दुसऱ्या कुणी नाही.” “उपोषण आम्ही करायचं आणि श्रेय दुसऱ्यांनी घ्यायचं? हे आम्ही मान्य करणार नाही.” “संजय राऊत फार बोलत आहेत, एवढं बार जाऊ द्या.” 🔹 भुजबळांवर खोचक टोला “आम्ही ओबीसींमध्ये गेलो नाही, तर ते आमच्यात आले आहेत. भुजबळांना माहिती होतं की मराठा समाजाला आरक्षण मिळणारच. त्यांनी अनेक पक्ष हाताळलेत, त्यामुळे जीआर त्यांना नीट कळतो. पण मराठा समाजाला ‘घुसखोर’ म्हणणं योग्य नाही. हे अधिकृत आहे,” असा टोला जरांगेंनी लगावला. 🔹 “मंडल आयोगावर चॅलेंज करू” “भुजबळ कोर्टात गेले तरी काही होणार नाही. हैद्राबाद गॅझेट हा सरकारी दस्तऐवज आहे.” “जर कोर्टात प्रश्न निर्माण झाले तर मी मंडल आयोगालाच चॅलेंज करेन.” 👉 एकंदर जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाच्या ठाम भूमिकेची पुनरावृत्ती केली आणि विरोधकांना थेट इशारा दिला –“गरीब मराठ्यांची लढाई आम्हीच लढतोय. यात कुणाच्याही खोडीला काही होणार नाही.

गरीब मराठ्यांची लढाई आम्हीच लढतोय; कुणाच्याही खोडीला काही होणार नाही” – मनोज जरांगे पाटील Read More »

कोकण धारा — सत्य, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज!

📺 कोकणातील बातम्या, ग्राउंड रिपोर्ट्स, आणि लोकांचे खरे प्रश्न — Konkandhara वर दररोज! 📰 Subscribe करा:    / @konkandhara   📘 Facebook: https://www.facebook.com/Konkandharaofficial 📸 Instagram: https://www.instagram.com/konkandharaofficial 🐦 Twitter (X): https://x.com/konkandhara 📅 नवीन व्हिडिओ दररोज – आवाज बना तुमच्या हक्काचा!

कोकण धारा — सत्य, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज! Read More »

नाशिकमध्ये डेंग्यूचा प्रकोप; आरोग्य यंत्रणा सतर्क

नाशिक शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मागील आठवड्यात ५० हून अधिक नवीन रुग्ण नोंदवले गेले. पालिकेने फवारणी, जनजागृती मोहिमा आणि आपत्कालीन रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत.– ठिकाण: नाशिक– महत्त्व: आरोग्य संकट, प्रतिबंधात्मक उपाय

नाशिकमध्ये डेंग्यूचा प्रकोप; आरोग्य यंत्रणा सतर्क Read More »

विदर्भात वीज कपातमुळे शेतकरी त्रस्त

अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यांत दररोज ८ ते १० तास वीज कपात होत आहे. कृषीपंप थांबल्यामुळे सोयाबीन व कापसाची पेरणी अर्धवटच आहे. शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे.– ठिकाण: विदर्भ– महत्त्व: शेती संकट, सरकारवर दबाव

विदर्भात वीज कपातमुळे शेतकरी त्रस्त Read More »

ठाकरे गटाचा मराठी भाषा रक्षणासाठी मोर्चा

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली ठाकरे गटाने मराठी भाषेला प्रथम भाषा म्हणून कायम मान्यता मिळावी, यासाठी मुंबईसह पुणे, ठाणे येथे भव्य मोर्चे काढले. घोषवाक्यांमधून मराठीच्या अस्मितेची भावना ठळक झाली.– ठिकाण: मुंबई, पुणे– महत्त्व: सांस्कृतिक अस्मिता, राजकीय दबाव

ठाकरे गटाचा मराठी भाषा रक्षणासाठी मोर्चा Read More »

कोकणात दमदार पावसाला सुरुवात, शेतीला मिळणार आधार

गेल्या काही दिवसांपासून रखडलेला मान्सून कोकणात जोरात दाखल झाला असून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे भात लागवडीसाठी आदर्श परिस्थिती निर्माण झाली आहे.– ठिकाण: कोकण– महत्त्व: शेतीस मदत, जलसाठ्यांमध्ये वाढ

कोकणात दमदार पावसाला सुरुवात, शेतीला मिळणार आधार Read More »

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी लांबणीवर

मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही न्यायालयात रखडलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आजची सुनावणी पुढे ढकलली असून पुढील तारीख १५ जुलै ठरवण्यात आली आहे. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा आणि अन्य संघटना पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहेत.– ठिकाण: दिल्ली / महाराष्ट्र– महत्त्व: सामाजिक आरक्षण, राजकीय दबाव

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी लांबणीवर Read More »

कोकणात आणखी ६ ग्रोथ सेंटर्स; पर्यटन आणि कृषी व्यवसायाला मिळणार चालना

कोकणधारा वृत्तसेवा | रत्नागिरी | २७ जून २०२५ कोकणातील विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, कोकणात आणखी सहा नवीन ग्रोथ सेंटर्स उभारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विशेषतः पर्यटन, कृषी प्रक्रिया उद्योग, मत्स्यव्यवसाय आणि स्थानिक उद्योजकांना मोठी चालना मिळणार आहे. या नव्या ग्रोथ सेंटर्समुळे कोकणातील बेरोजगारी कमी होईल, तसेच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होतील. उभारण्यात येणाऱ्या ग्रोथ सेंटर्ससाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील निवडक भागांचा समावेश करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या औद्योगिक विकास विभागाच्या अहवालानुसार, या केंद्रांमध्ये कृषी आधारित प्रक्रिया उद्योग, हस्तकला, पर्यटन सुविधा, कोल्ड स्टोरेज, लॉजिस्टिक हब आणि ई-मार्केटिंग केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. राज्याचे उद्योग मंत्री देवेंद्र भुजबळ यांनी सांगितले की, “कोकणाचा नैसर्गिक संपदा, संस्कृती आणि शेतीविषयक संपत्तीचा विकास करण्यासाठी ही केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावतील.“ स्थानिक शेतकरी, महिला बचतगट, पर्यटन व्यावसायिक आणि लघुउद्योजक या नव्या योजनांकडे उत्सुकतेने पाहत आहेत. शासनाकडून लवकरच या केंद्रांच्या ठिकाणांची अधिकृत घोषणा होणार आहे. Realted News आंतरराष्ट्रीय,कोकणची बातमी,बातम्या भाषेच्या वादातून पेटलं राजकारण! ठाकरे बंधूंचा मोर्चा होणार मुंबईत June 26, 2025 आंतरराष्ट्रीय,कोकणची बातमी,बातम्या मुंबई :राज्यात पुन्हा एकदा भाषेचा वाद पेटला आहे… Stock Market,आंतरराष्ट्रीय,कोकणची बातमी,बातम्या,भारत,मराठवाडा,महाराष्ट्र,संपादकीय,साहित्य कोकणात आणखी ६ ग्रोथ सेंटर्स; पर्यटन आणि कृषी व्यवसायाला मिळणार चालना June 26, 2025 Stock Market,आंतरराष्ट्रीय,कोकणची बातमी,बातम्या,भारत,मराठवाडा,महाराष्ट्र,संपादकीय,साहित्य कोकणधारा वृत्तसेवा | रत्नागिरी | २७ जून २०२५… आंतरराष्ट्रीय,कोकणची बातमी,बातम्या,भारत,मराठवाडा,महाराष्ट्र,संपादकीय,साहित्य मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी लांबणीवर June 26, 2025 आंतरराष्ट्रीय,कोकणची बातमी,बातम्या,भारत,मराठवाडा,महाराष्ट्र,संपादकीय,साहित्य मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही न्यायालयात रखडलेला…

कोकणात आणखी ६ ग्रोथ सेंटर्स; पर्यटन आणि कृषी व्यवसायाला मिळणार चालना Read More »

राज्यातील १५०० शाळा डिजिटल रूपात रुपांतरित होणार

महाराष्ट्र सरकारने ‘डिजिटल शिक्षण अभियान’अंतर्गत १५०० शाळा पूर्णतः डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड, ई-कंटेंट, इंटरनेट कनेक्शन आणि विद्यार्थ्यांसाठी टॅब दिले जाणार आहेत.– ठिकाण: राज्यभर– महत्त्व: शिक्षण सुधारणा, ग्रामीण भागातील संधी

राज्यातील १५०० शाळा डिजिटल रूपात रुपांतरित होणार Read More »